Thursday, May 12, 2011


वसंत ऋतुतला फुलोत्सव...

वसंत ऋतू म्हणजे चैतन्याची आनंददायी लहरच जणू.त्याच्या येण्याने अनेकानेक फुलझाडाना फुलण्याचे,उमलण्याचे डोहाळेच लागतात जणू...सध्या वसंत ऐन भरात आहे. निरनिराळ्या फुलांचा वसंत उत्सव बहरला आहे.नानाविध रूप,रंग,गंध आणि आकाराची फुले रुक्ष ,रखरखीत वातावरणात लक्ष वेधून घेत आहेत. मग भगभगीत वाटणारे वातावरण... तापलेली उन्हे हे सारेदेखील काहीसे सौम्य, शीतल वाटू लागते...काळोख्या रात्री एखादी मशाल आपले लक्ष वेधून घेते ना अगदी तशी...तशीच ही फुले आपले लक्ष वेधून घेतात अगदी दुरूनही ...
ऋतू आपली कुस बदलतो, तशी सृष्टिची रुपेही बदलत जातात.त्यांच्या लावण्य विभ्रमाचे अनोखे जग पुढ्यात येउन उभे राहते.निसर्गाच्या कुंचाल्यातून साकारलेल्या मोहमयी चित्रलिपिचे रहस्यही मग आपोआप उलगडत जाते.
हासरा,नाचरा,लाजरा,सुन्दर साजिरा अशा अनेकानेक विशेषणांनी ज्याचे वर्णन केले जाते,श्रावणाची असते तशी वसंताचीही एक साखळी असते. फाल्गुन,चैत्र अणि वैशाख हे तीन महिने म्हणजे वसंत ऋतूच्या अनेकानेक रंगानी नटलेले अणि प्रखर उन्हाने तापलेले...यातला चैत्र म्हणजे खराखुरा वसंत आत्मा...त्याच्या येण्याचे अवघ्या सृष्टिला जणू डोहाळेच लागलेले असतात..निसर्गराजा निरनिराळ्या रंगांची मुक्त हस्ते उधळण करू लागतो.
इवलाल्या पालवीच्या नाजूक-कोमल पानांनी झाकलेल्या पुष्पांनी डवरून गेलेल्या वृक्ष-लतांचे दर्शन सध्या जिकडे तिकडे घडते आहे.पाना-फुलांची ही सुकुमार शोभा सृष्टीवर अत्यंत उत्कटतेने अवतरली आहे.चैत्राच्या या पालवीचे रूपही मोठे मनमोहक असेच असते.पिंपळाची गर्द गुलाबी पाने नुसती पाहण्यातही मोठी मौज असते.तऱ्हे तऱ्हेच्या झाडांना छानदार पालवी फुटली आहे.चैतन्याची विलक्षण साक्ष ती देते आहे.या पालवीच्या सोबत अनेकाने रंगाची,रुपाची,आकाराची,सुवासाची फुले सृष्टीच्या सौंदर्यात आपल्या परीने भर घालीत आहेत.
या सगळ्यात सर्वाधिक कोण नटले आहे ? तर ती आहे घाणेरी...एरवी तिच्याकडे कोणाचे विशेष लक्षही जात नाही. पण सध्या ती अशी काही शृंगार करून बसली आहे की,नाजूक-साजूक शोभिवंत फुलांचा साज तिचे सौंदर्य वाढवतो आहे.वसंत म्हणजे घाणेरीचा साक्षात सखाच जणू...आणि आपल्या प्रियकराच्या आगमनाने ती अक्षरशः अंगाअंगाने मोहरली आहे.मधूनच येणारा खट्याळ वारा जणू तिची खोडी काढतो आहे.तिला चिडवतो आहे.कडूनिंब आपल्या पांढऱ्या तुर्यांनी लक्ष वेधून घेतो आहे.नाजूक फुलाचा शिरीष तर दुरूनच आपल्या अस्तित्वाची साक्ष देत उभा आहे.त्यचा तो घमघमाट एक मंद-धुंद सुवासिक झुळूकच अंगावरून गेल्याचे समाधान देत आहे.त्याच्या फुलांभोवती किती मधमाशा,भुंगे रुंजी घालीत आहेत.च्फ्याच्या निष्पर्ण फांद्यातून दांडोरे बाहेर पडले आहेत.काळ्या उमलताहेत.फुलताहेत. हळूहळू उभे झाडच फुलून गेलेय.त्याचा गंध पुलकित करतो आहे.
पांगारा,पळस,काटेसायर आणि चाफ्याचे पुष्पवैभव अपूर्व असेच असते.अंगार फुलल्याचा आभास हे फुले निर्माण करतात.ग्रीष्मात झलेली पानगळ...तापलेली उन्हे...ओसाड,भकास रान...वसंतातल्या पुष्प्न्रुत्याच्या रंगमंचाला पार्श्वभूमी असते ती अशी ती अशी भगभगीतपणाची... रुक्षपणाची...आणि त्यामुळेच हा रंगविलास अधिकच खुलतो...उठून दिसतो....काळोख्या रात्री एखादी मशाल आपले लक्ष वेधून घेते ना अगदी तशी...तशीच ही फुले आपले लक्ष वेधून घेतात अगदी दुरूनही ...
आंब्याच्या लांब लचक देठांना कैऱ्यांचे घ्होस लगडलेत. क्वची झाडे पाडी लागली आहेत.येता- जाता राघू या झाडांना लागलेल्या फळांवर चोच मारून ती पाडाला लागलीत का, याची खात्री करती आहेत.हे दृश्य केवळ पाह्ण्याठी एक गम्मत असते.करवंदीच्या जाळ्यांतून गोलाकार,गर्द निळी करवंदे डोकावताहेत.अंजन वृक्षाची निळाई ,नवलाई चकित करते.हळदीचा रंग ल्यायलेली पिवळ्याधमक फुलाची श्रीमंती आणि ते ऐश्वर्य मनामनाला मोहिनी घालतेय.मोगरा,जाई-जुईची सुवासिक फुले आणि रातराणीचे तुरे चांदण्या रात्रींना सुगंधित करीत आहेत.वसंतातले हे पुष्प-सम्मेलन पाहून आपण आचंबित होतो.निसर्गाने प्रत्येक झाला अलौकिकत्व बहाल केल्याची साक्ष मनोमन पटते.ही पालवी,ही फुलं आपल्याला बोलावताहेत हात पालावताहेत...
जोडीला कोकीळा 'पंचम' आळवते आहे.सारे पक्षी जणू मिलनाची गाणी गात आहेत. निसर्गाचा हा विराट खुलेपणा सारा निसर्गाविष्कार असा उघड्यावर पाडला आहे.आपल्या पुढ्यात उभा आहे.जे वसंताचे आहे त्याला चैत्रामागून येणारा वैशाख पूर्णत्व देतो.त्यामुळेच जणू चैत्रभर मुके असलेले गुलमोहराचे झाड आता आनंदभराने फुलले आहे.तांबड्याजर्द फुलांचे वेह्दक गुच्छ डोईवर घेऊन नाचते आहे.
आव्हान वसंताची भैरवी आता रंगात आलेली असते.साऱ्या चारचार सृष्टीला आता वेध लागलेत ते वर्षा राणीच्या आगमनाचे....

Saturday, May 7, 2011

आदिवासी क्रांतिकारक राघोजी भांगरे

परकीय सत्तेशी प्राणपणाने लढ़नारया आदिवासी महादेव कोळी जमातीच्या बंडखोरांनी आणि त्यांच्या नायकांनी स्वातंत्र्य चलवलित मोठे योगदान दिले आहे. राघोजी भांगरे हा या परंपरेतील एक भक्कम, ताकतवान, धाडसी, रुबाबदार आणि बंडखोर नेता होता. तुघलग आणि बहामनी सुलतानाच्या कालापासून इंग्रजी राजवतीच्या अखेर पर्यंत च्या कालातील बंडाच्या प्रदीर्घ परंपरेतील महादेव कोळी या आदिवासी जामातीतील राघोजी भांगरे( भांगरा ) हा सर्वात प्रभावी, पराक्रमी, शूरवीर आणि क्रांतिकारक होता.
पेशवाई बुडाल्यानंतर( १८१८ ) इंग्रजांनी महादेव कोल्यांचे सह्याद्रीतील किल्ले, घाट माथे राखान्याचे आधिकार काढून घेतले. किल्ल्यांच्या शिलेदारया काढल्या. बुरुज नस्ता केले. वतनदारया काढल्या. पगार कमी केले. परंपरागत आधिकार काढून घेतल्याने महादेव कोल्यान मध्ये मोठा असंतोष निर्माण जाला. सन १८२८ मध्ये शेतसारा वाढविन्यात आला. सारावसुलीमुले गोरगरीबांना आदिवासींना रोख पैश्याची गरज भासू लागली. ते सावकार , वान्यांकडून भरमसाठ दराने कर्जे घेऊ लागले. कर्जाच्या मोबदल्यात सावकार जमिनी बालकाऊ लागले. लोक भयंकर चिढले. सावकार आणि इंग्रजांविरुद्ध बंडाला त्यांनी सुरुवात केली. बंडखोर नेत्यांनी या बंडाचे नेतृत्व केले.
अकोले तालुक्यातील रामा किरवा याला पकडून नगर येथील तुरुंगात फाशी देण्यात आली ( १८३० ). यातून महादेव कोळी जमातीच्या बंडखोरांत दहशत पसरेल, असे इंग्रजांना वाटत होते. रामाचा जोड़ीदार राघोजी भांगरे याने सरकारविरोधी बंडात सामील होऊ नए यासाठी त्याला मोठ्या नोकरीवर घेतले. परंतू नोकरीत पदोपदी होणारा अपमान आणि काटछाट यामुले राघोजी चिढ्ला. नोकरीला लाथ मारुन बंडात उडी घेतली. उत्तर पुणे व नगर जिल्ह्यात राघोजी आणि बापू भांगरे यांच्या नेतृत्वाखाली उठाव सुरु जाला. १८३८ मध्ये रतनगड आणि सनगर किल्ल्यांच्या परिसरात त्याने बंड उभारले. कैप्टेन मकिन्तोशने हे बंड मोडन्यसाठी सर्व अवघड खिंडी, दरया, घाट, रस्ते, जंगले याची बारीकसारीक माहिती मिल्विली. बंडखोरांची गुपिते बाहेर काढली. परंतू बंडखोर वरमले नाहीत . उलट बन्ड़ाने व्यापक रूप धारण केले.इंग्रजांनी कुमक वाढवली. गावे लुटली. मार्ग रोखून धरले. ८० लोकांना कैद दहशतीमुले काही लोक उलटले. फंदफितुरीमुले रघोजीचा उजवा हात समजला जाणारा बापूजी मारला गेला. रघोजीला पकडण्यासाठी इंग्रज सरकारने ५ हाजारांचे बक्षीस जाहीर केले.
ठाणे गाजेटियर्स जून्या आवृतित "ओक्टोम्बर१८४३ मध्ये राघोजी मोठी टोली घेऊन घाटावरुन खाली उतरला आणि त्याने अनेक दरोडे घातले" असा उल्लेख आहे. राघोजीने मार्वाद्यानवर छापे घातले. त्यांनी पोलिसांत तक्रार केली. ठावठिकाना विचारायला आलेल्या पोलिसांना माहिती न दिल्याने चिडलेल्या पोलिसांनी आईचे निर्दयपणे हाल केले. त्यामुले चिडलेल्या रघोजीने टोली उभारून नगर ओ नाशिक मध्ये इंग्रजांना सालो की पालो करून सोडले. हाती लागलेल्या प्रत्येक मारवाड्याचे नाक कापले.राघोजीच्या भयाने मारवाड़ी गाव सोडून पलाले" असा उल्लेख अहमदनगरच्या गाजे टियर्स मध्ये सापडतो.
सातारयाच्या पदच्यूत छत्रपतीनना पुन्हा सत्तेवर आणण्यासाठी इंग्रजां विरुद्ध उठावाचे व्यापक प्रयत्न चालले होते त्यांच्याशी राघोजीचा संबंध असावा, असे अभ्यासकांचे मत आहे.बंडासाठी पैसा उभारने, समाजावर पकड़ ठेवणे व छल करणार्या सावाकरान्ना धडा शिकविने या हेतूने राघोजी खानदानी वसूल करीत असे. राघोजीच्या बंडा नंतर सुमारे पंचवीस वर्षांनी वासुदेव बलवंत फडके यांचे बंड सुरु जाले.नोव्हेंबर१८४४ ते मार्च १८४५ या कालात राघोजीचे बंड शिगेला पोहचले होते. बंड उभारल्या नंतेर रघोजीने 'आपण शेतकरी, गरीबांचे कैवारी असून सावकार व इंग्रज सरकारचे वैरी आहोत ' अशी भूमिका जाहिर केली होती. कुटूमबातील समाजातील स्रियाँ बद्दल राघोजीला अत्यन्त आदर होता. टोली तील कुणाचेही गैरवर्तन तो खपवून घेत नसे. शौर्य व प्रमाणिक नीतीमत्ता याला धार्मिकपणाची जोड़ त्याने दिली. महादेवावर त्याची श्रद्धा व भक्ति होती. भीमाशंकर, वज्रेश्वरी, त्रिंबकेश्वर,नाशिक, पंढरपूर येथे बंडा च्या कालात तो देव दर्शनाला गेला होता.तेथे त्याला पकडले.ठाण्याला नेले.राघोजी अत्यंत स्वाभिमानी होता.त्यांला इंग्रजी अधिकाऱ्यांनी वकील मिळू दिला नाही.त्याने स्वताच बाजू मांडली.पुढे त्याला फाशी देण्यात आली.