Thursday, April 1, 2010

ऋतू आला वसंत सांगायला...


वसंत रुतु आला की निसर्ग विविध रंगांची मुक्त हस्ते उधलन करू लागतो .पांगरा,पलस, काटेसायर ,गुलमोहर,बाहावा ,कशिया या झाडांची रंगीबेरंगी फुले आपले लक्ष वेधून घेताहेत.कदुनिम्बचेझाड रखरखीतउन्हाच्या पार्श्वभूमीवर अजुनी तरुण मी असेच सांगत आहे.चाफ्याने तर मनमोहक फुलांचा मला फूलवाला आहे. पान्गार्याची लालभडक फुले अंगार फुलाल्याचा आभास निर्माण करताहेत.मोगर्याचा सुगंध दरवालातो आहे. .निष्पर्ण झाडांना चैत्रपलावी फुटली आहे.करवान्दाच्या जाल्या काल्या झाल्यात,तर पिम्पलाची सलसल चैतन्याचे गाणे गाते आहे .लवकरच आम्ब्याचा रस गलू लागेल . पिसारा संभालूंन ऐतित चालणारा मोर आता पावसाची वाट पहातो आहे .कोकिला पंचम आलवते आहे. वसंतातली ही विविध रंगांची रानफुले मनाला मोहिनी घालतात.जगण्याला उभारी देतात...

1 comment: